त्यात त्यांचे काय चुकतेय म्हणा आपण जनताच त्याला जवाबदार असतो. आपण पक्षनिष्ठ न राहता व्यक्तिनिष्ठ राहतो. आपल्याला आवडणारा एखादा नेता एखाद्या पक्षामधून वर्षोन वर्षे निवडून येतोय आणि अचानक काही वादामुळे तो उद्या दुसऱ्या पक्षामध्ये जातो आणि येणाऱ्या निवडणुकीत तो परत नवीन पक्षाचा झेंडा घेऊन निवडून येतो. आपण येथे पक्षाची शिकवण, नियम बघत नाही. एवढे वर्षे तो नेता जुन्या पक्षाच्या नियमामध्ये, शिस्तीमध्ये राहून चांगली कार्ये करत असतो, त्यामुळेच आपण त्याला निवडून आणत असतो पण आपण समजतो की तो नेता चांगला आहे त्याने ही सर्व विकासकामे केली आहेत त्यामुळे तो जर दुसऱ्या पक्षात जाणार असेल तरी आपण त्यालाच निवडून आणले पाहिजे भले मग तो पक्ष कितीही बेकार असला, किंवा आपल्या विचारांशी सहमत नसला, किंवा अगदी दहशतवादाला पुरस्कृत करणारा असला तरी सुद्धा आपल्याला काही फरक नाही पडत. आपण त्यालाच निवडून आणतो. त्यामुळेच दर वेळेला त्रिशंकू सरकार ठरलेलेच असते.
(अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच नेते चांगले असतात जे आपल्या पक्षाशी इमानदार असतात आणि काही कारणास्तव आपला पक्ष सोडवा लागला तरी त्यांचे उद्दिष्ट्य समाजसेवाच हेच असते. पण असे नेते विरळाच !) व्यक्तिनिष्ठ राहण्याची आपली मनोवृत्ती कधी बदलणार आहे कोण जाणे?

पण लोकांना समजत नाही असे नाही. लोकांना समजण्यासाठी राजकारणी लोकांनी सांगण्याची गरज नाही. तमिळनाडू मधल्या समाजातील अगदी लहान घटकापासून मोठ्या घटकांपर्यंत सर्वाना २ जी घोटाळा माहित झाला होता. भले त्यातल्या तांत्रिक बाबी माहित नसतील पण एक देशात एक मोठा घोटाळा झाला आहे आणि तो तामिळनाडू मधील राज्याकर्त्यान्मुळे झाला आहे एवढे तरी नक्कीच समाजात होते. माझ्या चेन्नई ऑफिस मधल्या एका कलिगला काही दिवसापूर्वी कामानिमित्त फोन केला असता हा विषय निघाला त्यावेळेला तर ए. राजा बद्दल असलेला राग त्याच्या बोलण्यातून जाणवला. त्याने आतापर्यंत कधीच मतदान केले नव्हते पण तो रागाने ह्या वेळेला करुनानिधीच्या पक्षाविरुद्ध मतदान करायला जाणार होता. तो सांगत होता २ जी बद्दल इथले राजकारणी काहीच बोलत नाही आहे पण आम्हाला समजत नाही का? अरे आमच्या ऑफिस मध्ये झाडू मारणाऱ्या मुलाला ही माहित आहे कि ए राजा ने किती मोठा घोटाळा केला आहे.


वरील दोन्ही गोष्टीतून एकच जाणवते आहे.....
पब्लिकची मेमरी आता दिवसेंदिवस सुधारत चालली आहे ह्याचीच तर ही लक्षणे नाहीत का ??
0 comments:
Post a Comment
आवडले तर कमेंट करायला विसरू नका !!