यारी कि गाडी...

हिरो होंडा ची नवी जाहिरात यारी कि गाडी बघितली आहे का?


तब न स्पीड ब्रेकर होते थे, न नो एन्ट्री
अपनी यारी कि गाडी फुरररररर सी चलती थी.
पर जिंदगी का सफर काफी तेढा होता है दोस्तों
राहे बदल देता है

यारी बुला रही है....राहे दिखा रही है..
चलते ते हम जो बिछडे तो ये
ये गाडी मिला रही है....

जितनी दूर ये यारी जाये
उतनी दूर ये गाडी जाये
हिरो होंडा स्प्लेंडर ....यारी कि गाडी

आतापर्यंत पाहिलेल्या जाहिरातीतील हि सर्वात आवडती जाहिरात. सुंदर संकल्पना, सुंदर सादरीकरण, सुंदर संगीत आणि शेवटी हृदयाला स्पर्श करणारा फील.
तीन मित्र भर पावसात लहानपणी गल्लीत खेळताहेत. दोघे बसले असतात आणि तिसरा मित्र फुरररर करत गाडी चालवत येतो. बाकीचे पण त्याला सोबत देत गल्लीत गाडी चालवत फिरतात व एका चौकात बाहेर पडतात. पण तिघे तीन रस्त्याने जातात. त्यावेळेला तिघे आश्चर्यचकित होउन एकमेकांकडे बघतात. तेव्हा त्यांचे चेहऱ्यावरचे हावभाव खूप छान दाखवले आहेत. त्याच वेळेला बॅकग्राउंडला आवाज येतो.पर जिंदगी का सफर काफी तेढा होता है दोस्तों.... राहे बदल देता है.
तेच मित्र मोठेपणी आपापल्या कामधंद्यात असताना त्यांना ते दिवस आठवतात. बाहेर पण तसाच पाउस पडत असतो. खिडकीतून बाहेर बघितली तर गाडी दिसते. तशीच गाडी काढून सर्व मित्र त्याच चौकात भेटायला येतात. तिघांन पैकी एका मित्राची पॅंट वर करायची जी सवय असते ती अजून गेलेली नसते. तसेच फुररर्र्र करत गाडी चालवत गल्लीत फिरतात. शेवटी एकमेकांना येऊन मिठ्या मारतात. मानवी भावनांचे खूप सुंदर चित्रण...

ती जाहिरात माझ्या Youtube च्या साईट वर टाकली आहे.


माझ्या मित्रांना पण हेच सांगावेसे वाटते कि जरा जुन्या आठवणी जागवून पहा. ते तलावपाली वर फिरणे, कॉलेज बंक करून लायब्ररीत जाऊन बसने, बस स्टॉप वर तासनतास बस ची वाट बघत बसने, एक रुपयाचे शेंगदाणे घ्यायचे, आणि एक रुपयात सुद्धा किती कमी दिले असे बडबडत सगळे शेंगदाणे खायचे , त्यावेळेला दिवसातून १० ते १२ तास तरी एकत्र असायचो आज सहा महिन्यातून एकदा भेटायला होतेय ते सुद्धा कोणाचाना कोणाचा तरी प्रोग्राम चेंज झालेला असतो. जरा काही आठवत असेल तर बघा आठवून आणि आपापल्या गाड्या कडून या तलाव पाली ला भेटायला.
वरच्या जाहिरातीतील एका मित्राला गीटार वाजवता येत असते. माझ्या पण एका मित्राला गीटार वाजवता येते पण साल्याने कधी मनापासून तिकडे लक्षच दिले नाही. (हा ब्लॉग वाचणारे कुणी नसते तर जरा अजून शिव्या घातल्या असत्या). कधी आमची मेहफिल जमलीच नाही. त्यावेळेला वेळ होता, भेटी होत होत्या पण मजा करायला पैसा नव्हता, आज पैसा आहे तर वेळ नाही आहे भेटायला.

माझ्या सर्व मित्रांना हेच सांगणे आहे कि वेळ काढा आणि जे काही थोडेफार मित्र उरले आहोत आणि जी काही मैत्री उरली आहे ती टिकवून ठेवा. उद्या असे नको व्हायला कि पैसा कमावता कमावता, सर्व मित्रांना सोडून उंच शिखरावर जाऊन पोहोचाल, पण मागे वळून बघाल तर आम्ही शिखराच्या पायथ्याशी पण नाही दिसणार. त्यावेळेला खूप एकटे एकटे वाटेल, मित्रांची गरज भासेल पण जवळ कोणी नसेल....
जमले तर विचार करा.....आणि आपल्या आवडत्या व्यक्ती साठी,मित्रासाठी जरुर वेळ काढा...आयुष्य खूप छोटे आहे आणि वेळ खूप कमी आहे.

CONVERSATION

0 comments:

Post a Comment

आवडले तर कमेंट करायला विसरू नका !!

Back
to top