tag:blogger.com,1999:blog-72290570837883416872024-03-16T14:10:56.207+05:30|| भोवरा || फोटोग्राफी, आर्ट, प्रवास वर्णन, कथा, ब्लॉग ई.bhovra,भोवरा ब्लॉग, फोटोग्राफी, आर्ट, प्रवास वर्णन, कथा, ब्लॉग आणि भरपूर काही,
blog by Ashish Sawant, आशिष सावंत,Ashish Sawanthttp://www.blogger.com/profile/13929638411894959862noreply@blogger.comBlogger20115tag:blogger.com,1999:blog-7229057083788341687.post-44501280014716978112024-01-02T09:00:00.001+05:302024-01-02T09:00:00.126+05:30दृष्टिकोन !!<p style="text-align: justify;"><span style="font-family: verdana;"><u><b>घटना पहिली </b></u></span></p><p style="text-align: justify;"><span style="font-family: verdana;">जवळपास अठरावीस वर्षांपूर्वी एका मित्राच्या शेजारच्या कुटुंबामध्ये एक अपघात झाला होता. त्या कुटुंबाचा एकुलता एक मुलगा रॉयल एनफील्ड बुलेट चालवत असताना अपघात होऊन रस्त्याच्या दुभाजकावर आपटून जागच्या जागी वारला होता. बुलेटचे थोडे फार नुकसान झाले होते. रस्त्यावरच्या लोकांनी उचलून हॉस्पिटलला घेऊन गेले पण काही उपयोग झाला नाही. त्या कुटुंबावर तो मोठा आघात होता. त्याच्या पालकांची रडून रडून झालेली हालत अजून ही डोळ्यासमोर आहे. </span></p><p style="text-align: justify;"><span style="font-family: verdana;">त्या काळात शेकडा एका व्यक्तीकडे एखादी बुलेट असायची. अपघात झालेली बुलेट त्याच्या वडिलांची खूप आवडती बुलेट होती. त्यांनी आपल्या मुलासारखीच खूप चांगल्यारीतीने तिची जपणूक केली होती. त्यांच्या धारदार व्यक्तिमत्वाला ती बुलेट खुलून दिसायची. मुलगा मोठा झाल्यावर तो पण बुलेट वापरायला लागला. पण अचानक त्या बुलेटला झालेल्या अपघातमध्ये मुलाला गमावल्यानंतर त्यांचे त्या बुलेट वरून मनच उडून गेले. झालेला अपघात बुलेट च्या चुकी मुळे की त्या मुलाच्या चुकी मुळे झाला हे कळायला मार्ग नव्हता पण त्यांनी ती बुलेट समोर नकोशी वाटायला लागली पण ती विकून टाकावीशी पण वाटत नव्हती. मनावर मोठा दगड ठेवून त्यांनी ती विकायला काढली. </span></p><p style="text-align: justify;"><span style="font-family: verdana;">अपघात झालेली बुलेट म्हणून कोणी ग्राहक पण लवकर येत नव्हते. त्याच्या आईचे म्हणणे होते बुलेट कोणाला न विकता भंगार मध्ये देऊन तोडून टाकावी जेणेकरून परत असा कोणाचा अपघात होऊ नये. </span></p><p style="text-align: justify;"><span style="font-family: verdana;">हो ..नाही करता करता शेवटी त्यांनी बुलेट भंगारवल्याला पूर्ण तोडून स्क्रॅप मध्ये टाकण्यासाठी दिली. भंगारवाल्याने त्याचे पुढे काय केले माहीत नाही.</span></p><p style="text-align: justify;"></p><div style="text-align: justify;"><span style="font-family: verdana; text-align: left;">त्या आई वडिलांना आपल्या मुलाच्या निधनाला जवाबदार असलेली ती बुलेट जवळपास पण नको होती.</span></div><span style="font-family: verdana; text-align: left;"><div class="separator" style="clear: both; text-align: justify;">----------------------------------------------------------------------------<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhxlj3TI5cvzfbn7Qnf8S8Yt49OMX6p4WNVzeI7M-Cz94QbkADodYyt2M1tM1jjM7Q9pRY4O9-jk2SUApJYsmQOYrwuWut51KSZZJp4lAGhUHFzPMXsjDdcA6n3FZTkrSuPh7kp1U3HDOBib3eMPin5u2OAF78Mx8NXHKUwUE4r896bzCViWMCfvpHgVlDw/s612/bulllet%20rider.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="448" data-original-width="612" height="58" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhxlj3TI5cvzfbn7Qnf8S8Yt49OMX6p4WNVzeI7M-Cz94QbkADodYyt2M1tM1jjM7Q9pRY4O9-jk2SUApJYsmQOYrwuWut51KSZZJp4lAGhUHFzPMXsjDdcA6n3FZTkrSuPh7kp1U3HDOBib3eMPin5u2OAF78Mx8NXHKUwUE4r896bzCViWMCfvpHgVlDw/w80-h58/bulllet%20rider.jpg" width="80" /></a></div></span><span style="font-family: verdana;"><div style="text-align: justify;"><b><u>दुसरी घटना </u></b></div></span><p></p><p style="text-align: justify;">जळगावला असताना बँकेच्या एका शाखेत एक नवीन मुलगा लागला होता. आसामचा राहणारा होता. पहिलाच जॉब आणि पहिलीच पोस्टिंग अडीच हजार किलोमीटर दूर जळगाव मध्ये. तरुण कोवळे वय, काहीतरी करण्याची जिद्द, गरम रक्त पण तेवढाच नम्र स्वभाव, हुशार आणि कामामध्ये प्रामाणिक असल्यामुळे अल्प कालावधीत तो सगळ्यांचा लाडका झाला. त्याला स्पोर्ट्स बाइक ची भरपूर क्रेझ ...आपल्या कमाईने त्याने नवीन स्पोर्ट्स बाइक घेतली. बाईक स्पीड मध्ये चालवायची खूप आवड. इतर सहकार्यांनी स्पीड कमी करण्यावर समजावून पण संगितले होते. पण तरुण रक्त ते... साहसी गोष्टी करण्याच्या कोवळ्या वयात ह्या गोष्टी समजत नाही.</p><p style="text-align: justify;">कोविडचा दुसर्या लाटेचा लॉक डाउन चालू असताना बँका अर्धा दिवस चालू असायच्या. तो ऑफिस मधून निघून एका हॉटेल मध्ये जेवणाचे पार्सल आणायला गेला आणि एका वळणावर गाडी घसरून तो रस्त्यावर पालथा पडला. तो जो पडला तो कधी उठलाच नाही. शरीरातून एक थेंबही रक्त आले नव्हते. आतल्या आत हृदयाला मुका मार लागून तो जागीच मृत्यू पावला. लॉकडाउन मुळे रस्त्यावर वर्दळ पण नव्हती. खूप वेळाने रस्त्यावरून जाणार्या एका माणसाने त्याला बघून ओळखले आणि बँकेतील दुसर्या कर्मचार्याला फोन केला. त्याला हॉस्पिटल मध्ये घेऊन गेले पण डॉक्टरांनी आधीच त्याला मृत घोषित केले. सगळ्यात मोठी गोष्ट होती ती त्याच्या आई वडिलांना कळवणे.</p><p style="text-align: justify;">मोठ्या मुश्किलीने त्यांनी त्याच्या मोबाइल मधून नंबर घेऊन त्याच्या वडिलांना निरोप दिला. वडील दोन अडीच हजार किलोमीटर दूर...यायचे म्हटले तरी कमीत कमीत दोन दिवस जाणार. त्यांच्या घरापासून एयरपोर्ट 6..7 तास अंतरावर. जळगावला जवळचा एयरपोर्ट मुंबई किंवा नागपुर. तिथून परत 7..8 तासाचा प्रवास करून जळगाव... कमीत कमी दोन दिवस त्यांना लागणार होते...त्यात लॉकडाउन....दुसर्या राज्यातून आल्यावर 14 दिवसांचा विलग्नवास (quarantine).... लॉकडाउन मुळे ट्रेनच्या तिकीट मिळत नव्हत्या. खाजगी वाहन करून येणे शक्य नव्हते. त्याच्या आई वडिलांपुढे काहीच मार्ग नव्हता. कसे तरी करून ते इथे पोचले असते तरी त्याचे पार्थिव परत कसे घेऊन जाणार हा मोठा प्रश्न.</p><p style="text-align: justify;">शेवटी आई वडिलांनी नाइलाजाने आपल्या मुलाचे पार्थिव तुम्हीच रुग्णवाहिकेमधून पाठवून द्या म्हणून संगितले. इकडे डॉक्टरांनी पोस्टमार्टेम वगैरे सोपस्कार करून पार्थिव बँकेच्या शाखा अधिकारांच्या हवाली केले. हे सगळे बँकेच्या अधिकारांच्या ओळखीमुळे शक्य झाले नाहीतर पार्थिव फक्त नातलागांच्या हवाली केले जाते. </p><p style="text-align: justify;">त्याचे पार्थिव एक रुग्णवाहिका करून त्याच्या घरी आसामला पाठवण्यचे ठरवले. एक पूर्ण वातानुकूलित एसी रुग्णवाहिका बोलावून त्यात बर्फाच्या पेटीत त्याचे पार्थिव ठेवून घेतले. सोबतीला तीन ड्राईवर दिले जेणेकरून गाडी कुठे न थांबता डायरेक्ट आसामला पोचेल... पार्थिव घेऊन जाण्यासाठी लागणारे सगळे कागदपत्र, ड्राइव्हर चे ई-पास, त्यांचे तीन दिवसाचे खाणे पिणे (कारण मध्ये हॉटेल भेटतील..नाही भेटतील), आंतरराज्य ट्रान्सफर चे पेपर असे सगळे सोपस्कार करून त्याचे पार्थिव आसामला पाठवण्यात आले. बँकेच्या ओळखीमुळे सगळ्या गोष्टी अर्ध्या दिवसात जमवणे सोपे झाले सामान्य माणसाच्या आवाक्यात ह्या गोष्टी जमल्याच नसत्या.</p><p style="text-align: justify;">तीन दिवसाचा प्रवास त्या रुग्णवाहिकेने दोन दिवसात केला आणि ते पार्थिव त्याच्या आईवडिलांकडे पोहचवले. तिथेच त्याचे अंत्यसंस्कार झाले.</p><p style="text-align: justify;">त्याची स्पोर्ट्स बाइक पोलिस स्टेशन मध्येच तशीच पडून होती. काही महिन्यांनी त्याच्या आई वडिलांनी पोलिसांशी बोलणी करून बँकेच्या अधिकार्यामार्फत ती बाइक स्पेशल ट्रान्सपोर्टने त्यांच्या घरी मागवून घेतली.</p><p style="text-align: justify;">त्या मागे त्यांचा एकच उद्देश्य होता. की त्यांच्या मुलाची ती सगळ्यात आवडती गोष्ट होती त्याचा खूप जीव होता त्या बाईकवर आणि मुलाच्या शेवटच्या क्षणी तीच त्याच्या सोबत होती. म्हणून त्यांनी तो खर्च करून ती गाडी मागवून घेतली.<br /></p><p style="text-align: justify;"></p><div class="separator" style="clear: both; text-align: justify;">वरील दोन्ही घटना जवळपास सारख्याच...दोन्ही कुटुंबाच्या लाडक्या मुलांचा अपघाती मृत्यू...एका कुटुंबाने बुलेटला दोषी ठरवून तिचे अस्तित्व मिटवून टाकले. दुसर्या कुटुंबाने स्पोर्ट्स बाईकला मुलाची शेवटची आठवण म्हणून दोन हजार किमीचा प्रवास करून मागवून घेतले.</div><div class="separator" style="clear: both; text-align: right;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgG14KwdipvbxQnkNGwjel4NQrLd1P1D8BlKMt3yQwLiDM07pDls5mZ_dcOSFL4-jdAdoLdUfB0JrfpYxo4ZIMy7MK4P2DnLrZGbd52zlA-VdbZ8ix_WFxluJiMPjjUQ3tz5Kt13hB5wRpAc151tuJOn66-tpvbPf44wgdAxvpvr1AzMlocdYyua6h_XhVj/s450/216487303-vector-velocity-capturing-motorbike-beauty-expressing-freedom-in-pixels-motorcycle-vector.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="400" data-original-width="450" height="75" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgG14KwdipvbxQnkNGwjel4NQrLd1P1D8BlKMt3yQwLiDM07pDls5mZ_dcOSFL4-jdAdoLdUfB0JrfpYxo4ZIMy7MK4P2DnLrZGbd52zlA-VdbZ8ix_WFxluJiMPjjUQ3tz5Kt13hB5wRpAc151tuJOn66-tpvbPf44wgdAxvpvr1AzMlocdYyua6h_XhVj/w84-h75/216487303-vector-velocity-capturing-motorbike-beauty-expressing-freedom-in-pixels-motorcycle-vector.jpg" width="84" /></a></div><p></p><p style="text-align: justify;">आयुष्यात चूक आणि बरोबर असे काहीच नसते...प्रत्येकाचा पाहण्याचा <b>दृष्टिकोन</b> त्या गोष्टींना चूक किवा बरोबर ठरवतो.</p><div style="text-align: justify;"><br /></div><p style="text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjDjFEUr-jJxRMy7sHCmNceMcpX5sTrkA8OANDDk_ACmMjVlsFASvj6YoKeGGoMv3V9UhxjysyJCoc7R8b6X_S_JZwbMYMUJwdBVQQR5vzApIBQg6pCt7W5LJ6aWw6UGxVEj60_iPm-El9OzfFUG1W30LkiHUWa489lRGO5featw1RRdP89haY9pJ4NP0i3/s1080/%E0%A4%A6%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A8.png" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1080" data-original-width="1080" height="400" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjDjFEUr-jJxRMy7sHCmNceMcpX5sTrkA8OANDDk_ACmMjVlsFASvj6YoKeGGoMv3V9UhxjysyJCoc7R8b6X_S_JZwbMYMUJwdBVQQR5vzApIBQg6pCt7W5LJ6aWw6UGxVEj60_iPm-El9OzfFUG1W30LkiHUWa489lRGO5featw1RRdP89haY9pJ4NP0i3/w400-h400/%E0%A4%A6%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A8.png" width="400" /></a></p><p style="text-align: justify;"><br /></p>Ashish Sawanthttp://www.blogger.com/profile/13929638411894959862noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-7229057083788341687.post-62654269636677376442023-12-07T17:00:00.003+05:302023-12-07T17:00:00.250+05:30इन्तेहाँ हो गई...इंतेझार की | शराबी |<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="text-align: justify;"><span style="font-size: large;"><b><i>
१९८४</i></b></span> साली प्रकाश मेहरा अमिताभ बच्चन ला घेऊन एक चित्रपट काढतो. ह्या वर्षातला अमिताभचा हा दुसरा चित्रपट. पहिला श्रीदेवी बरोबर केलेला इन्किलाब हा जेमतेम चालला होता. मागल्या वर्षी म्हणजे १९८३ मध्ये चार पैकी एकच चित्रपट हिट होता "कुली". पण तो सुद्धा त्याला झालेला अपघातातून वाचल्यामुळे. त्यामुळे त्याला बॉक्स ऑफिस वर एका जबरदस्त हिटची गरज होती. सिनेमाचे समीक्षक अमिताभ वर टीका करायची एक ही संधि सोडत नव्हते. त्यामुळे त्यांची तोंडे बंद करण्यासाठी तर त्याला एका हिट चित्रपटाची जास्तचं गरज होती.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
प्रकाश मेहरानी दिलेली ऑफर अमिताभ लगेच स्वीकारतो. कारण प्रकाश मेहरा बरोबर त्याचे आधीचे पाच चित्रपट ओळीत हिट झालेले होते. (जंजीर, हेराफेरी, लावारीस, मुकद्दर का सिकंदर आणि नमक हलाल). त्यामुळे अमिताभला ह्या चित्रपटाकडून खूप आशा होती. ह्या चित्रपटात त्याला एका मद्यधुंद तरुणाचा रोल सादर करायचा होता. चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात व्हायच्या आधीच फटाके वाजवताना त्याच्या हाताला जखम होते. त्यामुळे पूर्ण चित्रपट त्याला आपला हात कायम कोटाच्या खिशात घालून ठेवायला लागतो आणि पुढे तीच त्याची स्टाईल बनते.<br />
<br /></div>
<div>
<div style="text-align: justify;">
</div>
<div style="text-align: justify;">
मी त्याच्या "शराबी" चित्रपटाबद्दलचं बोलतोय. त्यात त्याने आपली 'अँग्री यंग मॅन' ची इमेज कायम ठेवत रोमॅंटिक इमेज सादर केली आणि तो प्रेक्षकांची आणि समीक्षकांची दाद घेऊन गेला. एका गर्भश्रीमंत दारुड्या मुलाची इमेज त्याने आपल्या ढंगात सादर केली. त्याच्यासाठी हा दमदार कमबॅक होता. </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
ह्या चित्रपटातील अमिताभच्या भूमिकेचे जेवढे कौतुक झाले तेवढेच चित्रपटाच्या दिग्दर्शन, कथा आणि संगीताचे झाले. किंबहुना चित्रपटाच्या संगीताचे कौतुक जास्त झाले. ह्या चित्रपटाला संगीत बप्पीदांचे -बप्पी लहीरींचे होते. बप्पीदांना ह्या चित्रपटासाठी फिल्मफेयर पुरस्कारपण मिळाला होता. </div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">चित्रपटातील सर्वच गाणी हिट होती. </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
मुझे नौलाखा मंगा दे</div>
<div style="text-align: justify;">
मंझिले अपनी जगह है</div>
<div style="text-align: justify;">
दे दे प्यार दे </div>
<div style="text-align: justify;">
जहां चार यार मिल जाये</div>
<div style="text-align: justify;">
आणि </div>
<div style="text-align: justify;">इन्तेहाँ हो गई इंतेझार की<br />
<br />
तशी ह्या चित्रपटातील सर्वच गाणी मला आवडतात. पण खास करून <span style="font-weight: bold;"> इन्तेहाँ हो गई </span><b>....</b> आणि <b>मंझिले अपनी जगह है</b> ही दोन गाणी जरा जास्त भाव खावून जातात.</div><div style="text-align: justify;"><br /></div>
<div style="text-align: justify;"><span style="font-weight: 700;">इन्तेहाँ हो गई </span><span style="text-align: left;"><b>... </b></span></div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">गाण्याची सुरुवातच गिटारच्या सुंदर पीस ने आणि किशोरदाच्या 'ल' च्या बाराखडीत गायलेल्या हमिंग ने होते.</div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">किशोरदा ने नंतर उचक्या देत गायलेल्या गाण्याने तर ह्या गाण्याला चार चाँद लावले. बप्पीदा ने गिटार, व्हायोलिन, तबला, पिपाणी, ड्रम ह्या सगळ्या वाद्यांची सरमिसळ इतकी उत्तम रित्या केली आहे की त्याला तोडच नाही. किशोरदा च्या उदासभरी गाण्याचा मौहोल आशा ताईच्या आवाजाने एकदम जिंदादील होऊन जातो. वातावरणात आलेली मरगळ निघून जाते. किशोरदा आणि आशा ताई सारख्या गायकांकडून दुःख आणि आनंद अश्या दोन टोकांचे भाव एकाच गाण्यातून गाऊन घेऊन त्यात वाद्यांची उत्तमरीत्या सरमिसळ करून सुंदर गाणे बनवणे फक्त बप्पीदाच करू शकतो. सुरूवातीला आणि शेवटी वेगळे बोल असणारे आणि विरूद्ध भाव दर्शवणारे गाणे कदाचित एखादेच असेल.</div><div style="text-align: justify;">अमिताभ ने हलत डुलत, हात खिशात घालून आणि मान उडवत जागच्या जागी केलेला अभिनय आणि जयाप्रदाचे उत्तम नृत्य ह्या गाण्याला ऑन-स्क्रीन सुद्धा प्रेक्षणीय बनवते.</div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;"><br /></div><div><span style="text-align: justify;"> </span><b style="text-align: justify;">मंझिले अपनी जगह है</b><span style="text-align: justify;"> गाण्यावर पुढच्या ब्लॉग मध्ये..</span></div><div><span style="text-align: justify;"><br /></span></div><div><table align="center" cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="margin-left: auto; margin-right: auto;"><tbody><tr><td style="text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgNtF3TsPVhFDwiznr0dANfKE8LYBt6eOJGzNzm-lXoogyGX37YOM3YRm4TUDRZ9vjXn7_KtlBuMu-6HiXbxCcfSa-qasVEeYu2eOmbD4eNwT4FbIJUfAqY9MxD4BT4ml9Wv8_ph7k81wB3XtJvIUuJ0jlFVLSc1T4jeiI5oUbfKbT6lZHXKgZCZ1mMCMrn/s986/inteha%20ho%20gayi%20sharabi.png" style="margin-left: auto; margin-right: auto;"><img border="0" data-original-height="503" data-original-width="986" height="326" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgNtF3TsPVhFDwiznr0dANfKE8LYBt6eOJGzNzm-lXoogyGX37YOM3YRm4TUDRZ9vjXn7_KtlBuMu-6HiXbxCcfSa-qasVEeYu2eOmbD4eNwT4FbIJUfAqY9MxD4BT4ml9Wv8_ph7k81wB3XtJvIUuJ0jlFVLSc1T4jeiI5oUbfKbT6lZHXKgZCZ1mMCMrn/w640-h326/inteha%20ho%20gayi%20sharabi.png" width="640" /></a></td></tr><tr><td class="tr-caption" style="text-align: center;"><i><span style="font-size: xx-small;">Amitabh </span></i><span style="font-size: xx-small;"><i>Bachchan</i></span></td></tr></tbody></table><br /><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><br /></div><br /><span style="text-align: justify;"><br /></span></div>
</div>
</div>
भोवराhttp://www.blogger.com/profile/11477024367758008132noreply@blogger.com0Thane, Maharashtra, India19.2183307 72.9780897-9.0919031361788463 37.8218397 47.528564536178848 108.1343397tag:blogger.com,1999:blog-7229057083788341687.post-42765277820291723222023-11-29T04:30:00.005+05:302023-12-02T20:41:12.811+05:30कावळ्यांचे घरटे<div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">शेजारच्या सोसायटीमध्ये एक पेरूचे झाड होते. त्या झाडावर एक डोमकावळ्याचे जोडपे दरवर्षी अंडी घालायला यायचे. आमच्या स्वयंपाक घरातून ते झाड पूर्णपणे दिसायचं. गेली दहा-बारा वर्ष तरी आम्ही त्या कावळ्यांच्या जोडप्याला बघत होतो.</div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">कावळ्यांचे जोडपे फेब्रुवारी मार्चपासूनच घरट्याच्या बांधणीला सुरुवात करायची जेणेकरून पावसाळ्याच्या मध्यापर्यंत पिल्लू घरटे सोडून उडून जाऊ शकतील.</div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">एकदा का अंडी घालून झाली की कावळा किंवा कावळीण दोघांपैकी एक जण सतत पहारा देत बसतात.</div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">लहानपणी कुठेतरी वाचले होते की कावळ्यांच्या घरटे बांधण्याच्या जागेवरून शेतकरी त्या वर्षामध्ये किती पाऊस पडणार ह्याचा अंदाज बांधत असत आणि ते लॉजिक तंतोतंत गेले दहा-बारा वर्ष आम्ही अनुभवले होते.</div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">कावळा कावळीण जेव्हा झाडाच्या टोकावर घरटे बांधतात त्याचा अर्थ असा होतो की त्यावर्षी खूप कमी पाऊस पडणार आहे किंवा बेताचाच पाऊस पडणार आहे. जर घरटे झाडाच्या मध्यावर बांधले तर मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे यामध्ये शेतीला पुरेल आणि प्यायला वर्षभर पुरेल एवढे पाणी मिळेल. जर त्यांनी घरटे झाडाच्या खालच्या बाजूला बांधले तर त्यावर्षी प्रचंड पाऊस पडणार असतं आणि पूरसदृश परिस्थिती सुद्धा निर्माण होत असते. हे आपल्या शेतकऱ्यांचे अचूक मोजमापनेचे तंत्र आम्ही गेली दहा-बारा वर्ष अनुभवत होतो.</div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">एकदा का अंडी घातली की दोघांपैकी एक जण सतत अंडी उबवायला बसलेला असायचा. एक जण अन्न शोधायला जायचा आणि येताना आपल्या जोडीदारासाठी खायला घेऊन यायचा. मग दुसरा जोडीदार जायचा आणि आपल्या जोडीदारासाठी आणि नंतर पिल्लांसाठी अन्न घेऊन यायचा.</div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj54KLmTFl885CIHXwpGK93aU0JzUuvvpE2BUQVrtM3wVJao3xhoaQfQHo6QDH78-Ryb-01g6GfHkmZovnbWbq2afg7c5tzQBUm0M0U2iEXLrZ9bFq1vqqWcLGwg-HCals_m7rq7ksM-ncMSt19KFHRNHD7SPohryaErG4ir5_PkfKlyCI-nc8GuF0y6zE9/s996/crow.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em; text-align: center;"><img border="0" data-original-height="747" data-original-width="996" height="480" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj54KLmTFl885CIHXwpGK93aU0JzUuvvpE2BUQVrtM3wVJao3xhoaQfQHo6QDH78-Ryb-01g6GfHkmZovnbWbq2afg7c5tzQBUm0M0U2iEXLrZ9bFq1vqqWcLGwg-HCals_m7rq7ksM-ncMSt19KFHRNHD7SPohryaErG4ir5_PkfKlyCI-nc8GuF0y6zE9/w640-h480/crow.jpg" width="640" /></a></div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">मी किंवा बायकोने स्वयंपाक घराची खिडकी उघडली की दोघांपैकी जो कोण पहाऱ्याला असेल तो आम्हाला कर्कश्श आवाजात काव काव करून आवाज द्यायचा. कदाचित 'हॅलो' करायचा. मग आम्ही थोडासा भात किंवा चपातीचा एखादा तुकडा किंवा पावाचा एखादा तुकडा त्यांच्यासाठी खिडकीवर ठेवून द्यायचो. एखाद्या वेळेस काही ठेवले नसेल तर आम्हाला काव काव करत आवाज देत राहायचा.</div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">जर पोट भरलेले असेल तर कधी आमच्याकडे काही मागायचा नाही फक्त तिरपी मान करून आम्हाला बघत राहायचे.</div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">त्या झाडावर काळी मैना किंवा साळुंकी पक्षी, खारुताई, लाल चोचीचे पोपट, कोतवाल पक्षी, रॉबिन पक्षी हे सुध्दा येऊन जाऊन असायचे. सहसा त्यांच्या यायच्या जायच्या वेळा ठरलेल्या असायच्या. ते कधी कधी कावळ्याच्या घरट्याच्या फांदीवर सुध्दा बसायचे..पण कधी घरट्याकडे वाकड्या नजरेने बघायचे नाही. कावळा ही त्यांना कधी हाकलयाचा नाही.</div><div style="text-align: justify;"><div><br /></div><div>सगळे गुण्या गोविंदाने राहायचे त्या झाडावर.</div><div><br /></div></div><div style="text-align: justify;">कधी कधी कोकीळ पक्षी सुद्धा यायची.. ..कदाचित कावळ्याच्या घरट्यात अंडी घालण्यासाठी पण कावळ्याच्या सतर्कतेमुळे तिचा प्रयत्न हाणून पाडला जायचा.</div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">त्या झाडाच्या फांद्या खूप वाढून सोसायटीच्या सदस्यांच्या खिडकीतून घरात जाऊ लागल्या होत्या म्हणून सोसायटीने मागच्या वर्षी त्या झाडाच्या 70 ते 80 टक्के फांद्या छाटून काढल्या.</div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">त्यानंतर कावळा कावळी झाडावर येऊन परतून जायचे कारण त्यांचे घरटे बनवायला फांद्यांची बेचकीच राहिली नव्हती. ह्या वर्षी कावळ्यांनी बहुतेक दुसरे झाड शोधले असेल.</div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">अजूनही खडकी उघडली की एखादा कावळा काव काव हाक मारत खडकी वर येऊन जातो. तो कदाचित त्याच कावळ्यांच्या जोडी पैकी एखादा असेल असा अंदाज आम्ही बांधतो. दिसायला सगळेच कावळे जवळपास सारखेच त्यामुळे ओळखणे कठीण. आता तर डोमकावळे दिसणेच बंद झाले आहे.</div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">त्या झाडाने सुद्धा आपला जीव टाकून दिला. त्या नंतर ते पुन्हा बहरलेच नाही. फळे तर दूर...साधे नवीन पाने पण आली नाहीत. जास्तीत जास्त सुकतच गेले. उरल्या सुरल्या फांद्या सुद्धा वाळून गेल्या. पोपट..खार...साळुंकी ह्यांचे त्या झाडावर येणे जाणे बंद झाले.</div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">कावळा, कोतवाल आणि रॉबिन पक्षी सकाळ आणि संध्याकाळ त्या झाडावर येऊन पाच मिनिटे बसून जातात....कदाचित त्या झाडाच्या शेवटच्या क्षणी त्याच्याशी हितगुज करून जातात.</div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">ते सुकलेले झाड खालच्या पार्किंगमधल्या गाडीवर पडेल म्हणून सोसायटीने काही दिवसांपूर्वी पूर्ण छाटून घेतले.</div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">त्या संध्याकाळ नंतर कोतवाल आणि रॉबिन पण दिसेनासे झालेत. </div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">एका निसर्गचक्रामध्ये मनुष्याने पुन्हा यशस्वीरीत्या लुडबुड केली.</div><div style="text-align: justify;"><br /></div><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgZOZIZu02-KEf0zVnD82DhVV1X5vImTuc0ZjIGHugU9ZoIySslDgFiWyqNVhrqSXglZ_zTrlX9q-KOL6-sxlRPeibO49fDwC9OcBhq5fpW7p0cPNL2k4zdErkVyd4zH-IOxWe9ceGK8j6HUmmpYU9BIPqwuu7HR05637TWrxr1ZBK4GONCaD4Nb1og91mw/s2471/Society%20Compound.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="2471" data-original-width="2447" height="640" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgZOZIZu02-KEf0zVnD82DhVV1X5vImTuc0ZjIGHugU9ZoIySslDgFiWyqNVhrqSXglZ_zTrlX9q-KOL6-sxlRPeibO49fDwC9OcBhq5fpW7p0cPNL2k4zdErkVyd4zH-IOxWe9ceGK8j6HUmmpYU9BIPqwuu7HR05637TWrxr1ZBK4GONCaD4Nb1og91mw/w634-h640/Society%20Compound.jpg" width="634" /></a></div><br /><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><br /></div><br /><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><br /></div><br /><div style="text-align: justify;"><br /></div>Ashish Sawanthttp://www.blogger.com/profile/13929638411894959862noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-7229057083788341687.post-65999866817402116522023-07-24T17:00:00.003+05:302023-07-24T17:00:00.147+05:30एक आठवड्याचा नास्तिक... <div style="text-align: justify;"><span style="font-family: verdana;"><b><i>लहानपणी </i></b>नवरात्रीच्या दिवसात आजूबाजूचे वातावरण धार्मिक झालेले होते. आमच्या घरातपण अध्यात्मिक वातावरण असायचे. अश्यावेळी प्रवाहात न वाहता बगावत करायचे दिवस माझे. त्या दरम्यान दूरदर्शन वर अमिताभचा <b>'दिवार'</b> चित्रपट बघून मला पण नास्तिक बनण्याची खुमखुमी आली होती. दोन तीन दिवसांनी शाळेतल्या उपमुख्याध्यापिका बाई ज्या आम्हाला विज्ञान शिकवायच्या त्यांनी आम्हाला देव वगैरे काही नसतो...कोणी आतापर्यंत बघितला आहे का? विज्ञानाने देवाला सिध्द केले आहे का?? देव अस्तिवात नाही... असे अर्ध्या तासाच्या विज्ञानाच्या पिरियेड मध्ये भरगच्च लेक्चर देऊन नस्तिक बनण्यास अजून खतपाणी घातले.</span></div><div style="text-align: justify;"><span style="font-family: verdana;"><br /></span></div><div style="text-align: justify;"><span style="font-family: verdana;">दुपारी शाळेतून घरी आल्यावर मी घोषित करून टाकले..की मी देवाला मानत नाही....आजपासून मला देवाबद्दल काही सांगू नकोस...मी काही देवाची पूजा करणार नाही....आईने नेहमी प्रमाणे काहीच प्रतिक्रिया दिली नाही...फक्त माझ्याकडे बघून हसली आणि आपल्या कामाला लागली.</span></div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;"><span style="font-family: verdana;">संध्याकाळी काही मित्रांबरोबर एरिया मधील समाजमंदिर हॉल मध्ये गरबा बघायला गेलो...मित्र बोलला थांब आधी हॉल मध्ये जाऊन देवीच्या पाया पडून येऊया...मी म्हटले, मी नाही देवाला मानत..तुला जायचे तर जाऊन ये... तो म्हणाला, अरे गेट पर्यंत तरी चल.</span></div><div style="text-align: justify;"><span style="font-family: verdana;"><br /></span></div><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgAu9qQb2QsaLl9_neqASykAvVxlNdJaY0i6wcQxRqWAQJqtDVMWQJ-5a52npE1baK9MV7lQpQiPEqA32VCBXTMVDdT0e4k9-5Sbl0Mu6J2ZYjWMjzFRXYFiBiEMjHF4Gz91HI0rMEhFJ41su0tOueFEqlc7WffKiH3w0jywpFATt9A8y9gxjr_oc0qqQCo/s1350/Amitabh%20Deewar%20sitting%20on%20mandir%20temple.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1080" data-original-width="1350" height="512" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgAu9qQb2QsaLl9_neqASykAvVxlNdJaY0i6wcQxRqWAQJqtDVMWQJ-5a52npE1baK9MV7lQpQiPEqA32VCBXTMVDdT0e4k9-5Sbl0Mu6J2ZYjWMjzFRXYFiBiEMjHF4Gz91HI0rMEhFJ41su0tOueFEqlc7WffKiH3w0jywpFATt9A8y9gxjr_oc0qqQCo/w640-h512/Amitabh%20Deewar%20sitting%20on%20mandir%20temple.jpg" width="640" /></a></div><br /><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;"><span style="font-family: verdana;">मी विचार केला, अमिताभ पण मंदिराच्या पायऱ्या पर्यंत जायचा तर मी पण जाऊ शकतो. मित्र आतमध्ये पाया पडायला गेला...मी </span><span style="font-family: verdana;">मित्र येईपर्यंत</span><span style="font-family: verdana;"> दरवाजात घुटमळायला लागलो...अमिताभ स्टाईल मध्ये खांदे वर करून समजमंदिराच्या पायर्यांवर बसलो...दरवाजातून आत नजर गेली तर मला सकाळची विज्ञानाची शिक्षिका दिसल्या...आधी विश्वास नाही बसला...मनात म्हटले त्या नसतील त्या तर विज्ञाननिष्ठ नास्तिक बाई आहेत...पण परत दरवाजातून त्यांची झलक दिसली... हातात मडके घेऊन...कपाळाला कुंकू फासून...</span></div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;"><span style="font-family: verdana;">हा काय प्रकार आहे...मला समजेना...त्या नसतील दुसर्या कोणीतरी असतील.</span></div><div style="text-align: justify;"><span style="font-family: verdana;"><br /></span></div><div style="text-align: justify;"><span style="font-family: verdana;">मी चप्पल काढून आत गेलो तर त्याच बाई होत्या...दहा बारा बायकांचा रिंगण घालुन घागरी फुंकायचा कार्यक्रम चालू होता...आणि आमच्या बाई हातात रिकामे मडके घेऊन त्या रिंगणाच्या मध्यभागी अंगात देवी आल्यासारखे हा...हा...हा ...फु...फु..फु करत होत्या...बाजूच्या बायका हातात मडके घेऊन सुरात कुठलेतरी गाणे म्हणत रिंगण घेत होत्या..</span></div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;"><span style="font-family: verdana;">आईशपथ!! आयुष्यातला पहिला अपेक्षाभंग असेल तो...जी बाई सकाळी आम्हाला नस्तिक्तेवर एवढे ज्ञान देत होती ती आता अंगात देवी आणून घागरी फुंकते आहे.. ..</span></div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;"><span style="font-family: verdana;">सब साला झूठ है...ये दुनिया.. ये लोग...सब साले धोकेबाज है ...अश्या काही फिलिंग्ज यायला लागल्या होत्या...</span></div><div style="text-align: justify;"><br /></div><table align="center" cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="margin-left: auto; margin-right: auto;"><tbody><tr><td style="text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiPJFViLgGM0TlVH852HAQszuGqYIRewghGl3wehH9rrdXl4ojjvD_4PzjbAWJbMGMAlw74-ZcK2uZWcAy84VZzx8ApbstFM4jn6Hn_AIQSISMfgnB_DMNniML-iIXLpVl6ah52KL8KigNuv8yLmWIwtPo6Q3TpN05Ip0ykPunPIZXY1H_X_waYJ25vwmwr/s630/ghagar-funkane.jpeg" imageanchor="1" style="margin-left: auto; margin-right: auto;"><img alt="घागरी फुंकणे- इमेज लोकमतवरून साभार" border="0" data-original-height="473" data-original-width="630" height="240" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiPJFViLgGM0TlVH852HAQszuGqYIRewghGl3wehH9rrdXl4ojjvD_4PzjbAWJbMGMAlw74-ZcK2uZWcAy84VZzx8ApbstFM4jn6Hn_AIQSISMfgnB_DMNniML-iIXLpVl6ah52KL8KigNuv8yLmWIwtPo6Q3TpN05Ip0ykPunPIZXY1H_X_waYJ25vwmwr/w320-h240/ghagar-funkane.jpeg" title="घागरी फुंकणे- इमेज लोकमतवरून साभार" width="320" /></a></td></tr><tr><td class="tr-caption" style="text-align: center;"><span style="font-size: xx-small;">घागरी फुंकणे- इमेज लोकमतवरून साभार </span></td></tr></tbody></table><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;"><span style="font-family: verdana;">त्यात भर म्हणजे त्यांचा मुलगा कुठल्याश्या क्लास मधून आला होता..त्याने आई म्हणून हाक मारली...त्या तश्याच घागर फुंकत..हा...हा...हा करत रिंगणाच्या कडेला आल्या...मुलाने घराची चावी मागितली...</span></div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;"><span style="font-family: verdana;">हा..हा...हा... करत त्यांनी कोपऱ्यात ठेवलेल्या बॅग कडे इशारा केला...मुलगा पटकन जाऊन चावी घेऊन आला... त्यांनी परत हा...हा...हा... करत त्याला जवळ बोलावून सांगितले.... कुकरमध्ये भात लावला आहे फू..फू...फू.... डाळ बनवून ठवली आहे. हा..हा...हा.... तू आणि बाबा जेवून घ्या फू..फू...फू... मी येइन लवकरच ...हा ..हा...हा...</span></div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;"><span style="font-family: verdana;">मुलगा निघून गेला... मी बघतच राहिलो... अमिताभ बच्चन कधीच माझी साथ सोडून गेला होता... ह्या बाई तर भक्तीत लिन आहेत...मीच...उगाच देवावर संशय घेतला.....आता मला देव माफ करणार नाही ही भीती वाटायला लागली...महिषासुरा सारखी मला लोळवून देवी माझ्या छाताडावर उभी राहणार असे वाटायला लागले... तिथेच देवीच्या पाया पाडून माफी मागून मी बाहेर पडलो.</span></div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;"><span style="font-family: verdana;">घरी आल्यावर माझ्या कपाळाला लागलेले गंध बघून आई फक्त हसली...मला जाम ओशाळल्यागत झाले.</span></div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;"><span style="font-family: verdana;">माझ्यातला नास्तिक एक आठवडा पण नाही टिकला.</span></div><div style="text-align: justify;"><span style="font-family: verdana;"><br /></span></div><div style="text-align: justify;"><span style="font-family: verdana;"><br /></span></div><div style="text-align: justify;"><span style="font-family: verdana;"><br /></span></div><div style="text-align: justify;"><span style="font-family: verdana;">---</span></div><div style="text-align: justify;"><span style="font-family: verdana;">आशिष सावंत</span></div>Ashish Sawanthttp://www.blogger.com/profile/13929638411894959862noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-7229057083788341687.post-37164179866005213862022-03-07T09:30:00.003+05:302022-03-07T09:30:00.156+05:30अण्णा धुरी | Anna Dhuri | <div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">"आशिष !! अरे अण्णा आज गेले रे!!! " मिलिंद ने फोन वर सांगितले. </div><div style="text-align: justify;">मला काय बोलावे ते सुचलेच नाही...तोंडातून फक्त अरे रे रे ! निघून गेले. </div><div><br /></div><div style="text-align: justify;">अण्णा म्हणजे रघुवीर धुरी... मिलिंदचे सख्खे काका .. वय जवळपास नव्वदी पार .. माझे तसे डायरेक्ट नाते काहीच नव्हते पण लहानपणापासून आमच्या कुटुंबाचे खूपच घनिष्ट संबंध होते. </div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">मी आणि मिलिंद लहानपणापासून त्याच्या व्यक्तिमत्वाचे चाहते होतो. आमच्या गप्पा मध्ये त्यांच्या वर खूप वेळ प्रदीर्घ चर्चा व्हायची. </div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">अंगाचा रंग सोडला तर मला तर ते विनोद खन्ना सारखे वाटायचे . आडवा भांग , उंच शरीरयष्टी, काटक अंग, चेहऱ्यावर नेहमी एक मिस्कील हास्य, अंगाचा वर्ण फक्त काय तो आयुष्यभर शेतात राबून सावळा झालेला...हातात एक बहुतेक HMT चे सोनेरी चप्पट घड्याळ असायचे. त्यांच्या काळ्या आणि काटक मनगटावर ते उठून दिसायचे. </div><div style="text-align: justify;"> </div><div style="text-align: justify;">गावावरून पहाटे मिलिंद च्या घरी आले की आठ साडे आठ ला "काय सावंतांनु काय चालला हा?" अशी मालवणीत खणखणीत हाक टाकत आमच्या घरी यायचे. </div><div><br /></div><div style="text-align: justify;">इकडच्या तिकडच्या गप्पा व्हायच्या, चहा-पाणी व्हायचे. मला त्यांच्या गप्पा ऐकायला मजा यायची. रविवारी तर गप्पा चांगल्या दोन-तीन तास चालायच्या. मग अगदी क्रिकेट पासून राजकारणापर्यंत, गावापासून देशापर्यंत गप्पा चालायच्या. त्यांच्या कडे नेहमी नवीन गोष्टींचा आणि घटनांचा खजिना असायचा. अगदी ऐकत राहावा असा... </div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">माझे वडील सांगायचे की राठिवडे गावात त्यांचे नाव होते. त्यांच्या शब्दाला वजन होते. गावकरी लोक सुद्धा त्यांना मानायचे. आमच्या आंगणेवाडी गावी जाणारा रस्ता त्यांच्या गावातून जायचा. मी रिक्षाने जाताना नेहमी रस्त्याच्या आजूबाजूला त्यांना शोधायचो. एकतर देवळात, शेतात किंवा चावडीवर ते हमखास दिसायचे. रिक्षा दोन मिनिट थांबवून त्यांच्याशी बोलूनच आम्ही पुढे जायचो. निघताना माझ्या हातात त्यांच्याच शेतातला एखादा कलिंगड जबरदस्ती द्यायचे. एसटी बस मधून जाताना पण एसटीचा ड्राइवर त्यांना बघून हमखास बस थांबवायचा. त्या मार्गावरून जाणारे बहुतांशी कंडक्टर आणि ड्राइव्हर त्यांच्या ओळखीचे होते. आणि त्यांचा मान एवढा होता कि ड्राइवर गाडी धीमी करून त्यांना हाक मारूनच पुढे जायचा. </div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">मला लहानपणी नेहमी चांगला अभ्यास कर..खूप शिक आणि मोठा हो.... आई बापाचे नाव काढ असे नेहमी सांगायचे. त्यात इतर मोठ्या लोकांसारखे टिपिकल सांगणे नसायचे. एका आपुलकीने अगदी मनापासून प्रेमाने सांगायचे....त्यात त्यांची कळवळ दिसून यायची त्यामुळे त्यांच्या बद्दल नेहमी एक आपुलकी वाटायची. थोडा मोठा झाल्यावर पाठीत प्रेमळ धपाटा घालून गेल्या परीक्षेत किती मार्क काढलेस असे हमखास विचारायचे. </div><div><br /></div><div style="text-align: justify;">ते मुंबई ला आले की मिलिंद कडे चार पाच दिवस राहायचे. आम्हाला नेहमी त्यांचा आदरयुक्त दरारा असायचा. त्यांच्या पुढ्यात आम्ही कधी वाह्यात गप्पा किंवा फालतुगिरी करायचो नाही. गावी परत जाताना आमच्या कडे "सावंतांनु येतेय आता" अशी निरोपाची हाक टाकल्याशिवाय जायचे नाही. आम्ही पण आमच्या घरातले पाहुणे निघाल्यासारखे त्यांनाअगदी जवळच्या बस स्टॉप वर जाईपर्यंत हात हलवून निरोप द्यायचो. </div><div><br /></div><div style="text-align: justify;">ह्या अण्णांची एक खासियत होती. त्यांना शरीरातल्या नाडीचे आणि नसांचे चांगले उपजत ज्ञान होते. त्यांच्या वडिलांकडून की आजोबांकडून आणि स्वतःच्या अनुभवातून ते आले होते असे ते सांगायचे. नाडी बघून कसला त्रास आहे हे पण ते सांगायचे. </div><div><br /></div><div style="text-align: justify;">मला आठवते .... मी सातवी आठवीला असताना मला खेळताना एकदा पाठीत उसण भरली होती . एकदोन दिवसात जाईल म्हणता म्हणता चांगली दोन आठवडे त्रास होत राहिला. डॉक्टरांच्या गोळ्याने फक्त तात्पुरते वेदना शमन व्हायचे. पण दुखणे काही जात नव्हते. मणक्याचे हाड आणि माकडहाड चांगलेच धरले होते. अश्यातच अण्णा नेमके गावावरून आले होते. वडिलांनी बोलता बोलता त्यांना माझ्या पाठीचे दुखणे सांगितले. त्यांनी मला नेमके कुठे दुखते आहे. उठताना बसताना कुठे कळ येते आहे ते नीट बघितले आणि मग मला हात सैल सोडून समोर उभे राहायला सांगितले. मग हाताच्या मागच्या कोपरावरून हात फिरवत पुढच्या बाजूची एक नस शोधून ती चिमटीत पकडून दाबली, एक सणसणून कळ डोक्यातून मणक्यात गेली. तीच नस दाबून त्यांनी मला खाली ओणवे वाकून परत उभे राहायला सांगितले प्रचंड वेदना सहन करत मी त्यांनी सांगितले तसे दोन तीन वेळा केल्यानंतर त्यांनी नस सोडून दिली आणि म्हणाले 'आता कमी होईल दुखणे' असे म्हणाले. आणि पुढच्या एक दोन तासात मला आराम पडला. आखडलेली पाठ आणि उसण जी गायब झाली ती आजतागायत परत आली नाही. </div><div><br /></div><div style="text-align: justify;">संध्याकाळी चहाला घरी आले तेव्हा पाठीत धपाटा टाकून म्हणाले "काय मग गेले का पाठीचा दुखणे?" ...मी आनंदात हो म्हणालो जसे काही दुखणेच नव्हते मला. त्यांच्या चेहऱयावर सुद्धा मी कसे तुला बरे केले ह्याचा आनंद झळकत होता. आनंदाच्या भरात त्यांनी एक किस्सा सांगायला सुरुवात केली. </div><div><br /></div><div style="text-align: justify;">एकदा कसाल किंवा मालवण (नेमके नाव लक्षात नाही) कुठल्यातरी एसटी डेपोतील एक ड्राइव्हर बस डेपोत लावून उतरत असतानां त्याच्या पोटरीत गोळा आला आणि त्याची पायाची नस आखडली गेली आणि त्याला ड्राइव्हरच्या खुर्चीवरून पाय बाहेर काढून उतरता येईना. खूप प्रयन्त करूनही त्याला हालचालच करता येईना. उलट नस अजून दाबली जाऊन त्याला कंबर आणि जांघेत भयंकर कळ येऊ लागली. बाकीचे ड्रायव्हर, कंडक्टर मदतीला आले. त्यांना हि तो हात लावू देत नव्हता. त्याला आपली नस तुटायची भीती वाटत होती. शेवटी डेपोतील कामगारांनी ठरवले की ड्रायव्हरची खुर्ची कटर ने कापून काढायची आणि नंतर वेल्डिंग करून जोडता येईल. पण तो ड्रायव्हर घाबरून काहीच करायला देत नव्हता आणि वेदनेने कळवळून ओरडत राहिला. </div><div><br /></div><div style="text-align: justify;">एकदोघांनी आजूबाजूचा डॉक्टर शोधून आणला त्याने पण प्रयन्त करून पहिले पण ड्रायवरला काही जागचे हलता येईना आणि वेदनेने तो हैराण होऊ लागला. त्याचवेळी कोणाला तरी राठिवडे गावातील अण्णांची आठवण झाली तेच ह्या ड्रायवर ला मोकळे करू शकतात. पण त्यानं बोलावणार कसे? त्याकाळी फोन वगैरे नव्हते. गावात क्वचितच कोणाकडे रिक्षा असायची. शेवटी डेपो कंट्रोलरच्या परवानगीने एक एसटी स्पेशली अण्णांना आणण्यासाठी राठिवडे ला निघाली. </div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">गावात दिवसाला दोनच एसटी ची ठरलेल्या फेऱ्या व्हायच्या. अशी अवेळी आलेली एसटी बघून गावातली लोक पण आश्चर्यचकित होऊन बघायला आली. कंडक्टर नसलेली रिकामी एसटी बघून तर अजून बुचकळ्यात पडली. ड्रायव्हर ने गाडी देवळाजवळ थांबवून अण्णा कुठे भेटतील ह्याची चौकशी केली. ड्रायव्हर कडून सगळं मामला समजल्यावर गावातली दोन चार पोरे वेगवेगळ्या दिशेला पिटाळले गेली. एकाला घरी पाठवले गेले...एक शेतात गेला...एक चावडीवर गेला.. </div><div><br /></div><div style="text-align: justify;">अण्णा त्यावेळी शेतात काम करत होते. त्यांना निरोप मिळाला आपल्याला न्यायला एसटी आलीय म्हणजे नक्कीच सिरीयस भानगड असणार. अण्णा तसेच अर्धी चड्डी आणि बनियान वर निघाले. गाडी डेपोत आली. तो अडकलेला ड्रायव्हर अण्णांना पण हातच लावू देत नव्हता. त्याला शरीरातील नस तुटायची भीती वाटत होती....अण्णांनी समजावून सांगितले पण तो घाबरून काहीच करू देत नव्हता. शेवटी असह्य वेदनेने त्याची शुद्ध हरपली. अण्णांनी मग वर एसटी मध्ये चढून त्याच्या पाठीच्या आणि पायाच्या नसा शोधून त्या हळू हळू दाबून मोकळ्या केल्या. जश्या ह्या नसा मोकळ्या होत गेल्या तश्या त्याच्या वेदना कमी होत गेल्या आणि पाणी शिंपडल्यावर त्याला शुद्ध आली. पाय मोकळे होऊन तो स्वतः ड्रायव्हरच्या सीट वरून खाली उतरून आला आणि डायरेक्ट अण्णांचे पाय धरले. सगळ्यांनी अण्णांनी त्यांची फी विचारली अण्णांनी फक्त त्यांना मी पहिल्यांदाच हाफ चडडी आणि बनियान वर एवढा लांब आलोय मला घरापर्यंत सोडा एवढेच सांगितले. </div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">त्यांनी ह्या कामाचे कधीच पैसे घेतले नाही. त्यांचे म्हणणे होते की मला ह्या अश्या अडल्या नडल्या लोकांची मदत करण्यासाठी मिळालेली ही दैवी देणगी आहे. मी ह्याचा मोबदला घेतला तर माझी ही दैवी देणगी कमजोर होईल. त्यांनी कधीच ह्या कामाचे पैसे घेतले नाही आणि ह्या ज्ञानाची कधी जाहिरात ही केली नाही. ज्यांना माहित होते तेच अण्णांकडून अश्या नसा मोकळ्या करून घ्यायचे. अण्णा स्वतःहून कधीच कोणाला सांगायचे नाही किंवा सुचवायचे नाही. </div><div><br /></div><div style="text-align: justify;">मी त्यांच्या ह्या कलेचा सॉलिड फॅन झालो होतो. मी लगेच त्यांच्या मागे लागलो होतो मला पण हे शिकवा मी पण लोकांना मदत करेन. ते हसले आणि म्हणाले मी माझ्या स्वतःच्या पोरांना सुद्धा हे शिकवत नाही ही कला.... मी मरताना माझ्या बरोबरच घेऊन जाणार. </div><div style="text-align: justify;"><br /></div><div>'असे का?' मी विचारले </div><div><br /></div><div style="text-align: justify;"><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEjY_ldQ0-VSSe2bxNKY_m51KC4oWo43gYJFLZzGozi290-2IGDZD9E-XJvIBCZ-cAextkuryQBmoAX3ndI6WByypc9jT2qCZhTkvhj5t5a35bJAbTAWabHyrlVz9AnpSI3KhWNXeDKhgaIAIMJnyQvA_EuZngroSOBpJk7Qa0H_8CKsYWj3sNiLpKX1kQ=s580" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="580" data-original-width="542" height="320" src="https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEjY_ldQ0-VSSe2bxNKY_m51KC4oWo43gYJFLZzGozi290-2IGDZD9E-XJvIBCZ-cAextkuryQBmoAX3ndI6WByypc9jT2qCZhTkvhj5t5a35bJAbTAWabHyrlVz9AnpSI3KhWNXeDKhgaIAIMJnyQvA_EuZngroSOBpJk7Qa0H_8CKsYWj3sNiLpKX1kQ=s320" width="299" /></a></div>"अरे !सकाळी मी जी तुझी नस शोधून दाबली त्याच्या ऐवजी चुकून बाजूची नस दाबली असती तर तुला आयुष्यभर पाय हलवता आले नसते. एक चुकीची नस दाबली गेली तर लकवा मारू शकतो. मला पाहिजे तर मी कोणाला थोड्यावेळ साठी किंवा आयुष्यभरासाठी जायबंदी करू शकतो. म्हणून मी हे ज्ञान कोणाला देत नाही आणि माझ्याकडे आहे म्हणून कोणाला सांगतही नाही. कोणी चुकीच्या प्रवृत्तीच्या व्यक्तीने किंवा चांगल्या व्यक्तीने सुद्धा रागाच्या भरात कोणाला ही त्रास देण्यासाठी असे करू शकतो. माझी मुले पण गरम डोक्याची आहेत राग आला तर कोणालाही त्रास देऊ शकतात म्हणून हे ज्ञान मी कोणालाच शिकवत नाही. अगदी स्वतःच्या पोटच्या पोरांना सुद्धा नाही .... इतकेच काय मी हे ज्ञान स्वतःवर सुद्धा वापरू शकत नाही . </div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">त्यांचे म्हणणे मला पटले. आयुष्यात असे कितीदा प्रसंग आले जेव्हा मी एखाद्या व्यक्तीवर वर खूप चिडलो असेन आणि त्या व्यक्तीला त्रास द्यायची पण इच्छा झाली असेल. ही कला माहित असती तर कदाचित उपयोग पण केला असता. म्हणूनच ते ज्ञान मिळवण्यास कधी पात्र नव्हतो. </div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">त्यानंतर ते जेव्हा जेव्हा भेटले तेव्हा तेव्हा मी त्यांना ते ज्ञान शिकवण्याची विनंती केली आणि त्यांनी हसून टाळून दिली. आज ते ज्ञान किंवा शास्त्र पण त्यांच्याबरोबर निघून गेले. त्यांचा मोठेपणा, व्यक्तिमत्व, कार्य क्षमता, मृदू स्वभाव , आपलेसे करण्याची वृत्ती, निस्वार्थीपणा, लोभस अन मनमिळावून स्वभाव, मित्रपरिवार नातेवाइकांबद्दलची आपुलकी हे सगळे आज त्यांच्या बरोबर संपले. आयुष्याच्या शेवटी त्यांना अर्धांगवायू झाला होता. आजारपणामध्येच त्यांचे जीवन संपले. आपल्या ग्रामीण जीवनातील एक मोठा अध्याय संपला. त्यांचे कार्य, व्यक्तिमत्व आणि जीवन प्रवास किती उत्तुंग होता ह्याचा अंदाजही कदाचित त्यांच्या नातलगांना नसेल पण माझ्यासाठी आणि मिलिंद साठी ते आभाळाएवढे मोठे होते. </div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">इतर माणसांप्रमाणे अण्णां मध्ये ही काही गुण दोष असतील...आयुष्यातील काही निर्णय चुकले पण असतील. पण आयुष्याचा शेवटी जेव्हा पाप पुण्याचा जमाखर्च होऊन फक्त पुण्य गाठीशी राहते तेव्हा माणसाचे आयुष्य सफल झाले असे म्हणता येते. अण्णा त्या बाबतीत नक्कीच पुण्यवान होते. </div><div><br /></div><div style="text-align: justify;">त्यांच्याबद्दल वाटणाऱ्या भावना ह्या आम्हा दोघांसाठी शब्दात मांडणे खूप कठीण आहे. त्यांचे व्यक्तिमत्व आणि आठवणी आम्ही आमच्या मनात आणि शरीरात रिझवतो. एक शब्दात न मांडता येणारा असा आदर त्यांच्याबद्दल होता आणि नेहमी राहील. </div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">एका ब्लॉग मध्ये त्यांचे आयुष्य मांडणे खूपच कठीण आहे त्यांच्यावर लिहायला एक पुस्तकही कमी पडेल. हा ब्लॉग म्हणजे त्यांच्या आभाळभर व्यक्तिमत्वाला एक छोटी श्रद्धांजली. </div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;"><br /></div>Ashish Sawanthttp://www.blogger.com/profile/13929638411894959862noreply@blogger.com4Thane, Maharashtra, India19.2183307 72.9780897-9.0919031361788463 37.8218397 47.528564536178848 108.1343397